- Breaking News, नागपुर समाचार

हिंगणघाट समाचार : तकऱ्यांचा खंडित विजपुरवठा सुरु न केल्याने आ.समिर कुणावार यांनी केले उपोषण

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपाचे साखळी उपोषण

हिंगणघाट समाचार, दि. १४ : जिल्हयात विद्युत मंडळाने कुठलीही पुर्वसुचना न देता थेट रोहीत्रावरुन शेकडो बळीराजांच्या बांधावरील विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा सपाटा सुरुच असून शेतकऱ्यांचा खंडित विद्युत पुरवठा तात्काळ सुरु करण्याचे मागणीसाठी हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार यांनी शेकडो भाजपा पदाधिकाऱ्यांसह थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली. 

यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच ऊर्जामंत्री यांनाही आ.कुणावार यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले. तसेच महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्वतः भेटून शेतकऱ्यांची कैफियत मांडली असतांनासुद्धा सरकारने तथा महावितरणने कोणताही प्रतिसाद दिला नाही, शेतकऱ्यांच्या मागण्या मंजुर न झाल्यामुळे अखेर आन्दोलनाचे हत्यार उपसावे लागल्याचे आ.कुणावार यांनी सांगितले.

आज दुपारी १२ वाजेपासुन या साखळी उपोषणाला सुरुवात झाली असून यात संतप्त शेतकऱ्यांसह भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट,महामंत्री किशोर दिघे,भाजयुमो प्रदेश सचिव अंकुश ठाकुर,जिल्हाध्यक्ष वरुण पाठक,जेष्ठ कार्यकर्ते मिलिंद भेडें,वसंतराव आंबटकर,भाजपा महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा दुधबडे,जि.प.सभापती माधव चंदनखेड़े,मृणाल माटे इत्यादि उपोषणाला बसले आहेत.

वर्धा जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त काळा जिल्हा असुन सध्या चना,गहु यासारखी पिके शेतक-यांच्या शेतात उभी आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे सोयाबीन पिकाने यापूर्वीच दगा दिला असून शेतक-यांचा चना व गहु या पिकाकरिता पाण्याची अत्यंत गरज आहे.

शेतक-यांना कुठल्याही प्रकारचे देयक न देता तसेच पूर्व सुचना न देता कोरोना काळातील प्रलंबित विज देयकाची मनमानी वसुली सुरु आहे. शेतक-यांच्या अडचणीच्या काळामध्ये मोठी रक्कम भरण्याचा तगादा लावला जात आहे,ही बाब निषेधार्य असून आहे.

आजच्या साखळी उपोषणाच्यावेळी शेतक-याच्या शेतातील विद्युत पंपाची विज तोडणी तात्काळ थांबवीणे, शेतक-यांचे खंडित केलेले बांधावरील विजपंपाचे विज कनेक्शन तातडीने जोडण्यात यावे, चालु हंगामात मर रोगामुळे शेतक-यांचे तुर या पिकांचे पुर्ण नुकसान झाल्याने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, खरीप हंगाम २०२० मध्ये झालेल्या शेतक-यांच्या कापूस व सोयाबीन हे ३३ टक्के पेक्षा जास्त झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनाम्या नुसार वर्धा जिल्हाधिकाऱ्यांनी मागणी केलेले १७८ कोटी राज्य सरकारने वर्धा जिल्हातील शेतक-यांच्या खात्यात तात्काळ जमा करावे अश्या विविध मागण्या करण्यात आल्या.

उपरोक्त आंदोलनात जि. प.सदस्य शरद सहारे , रोशन चौखे, किशोर शेंडे, शुभांगी संजय डेहणे, विनोद लाखे, पंचायत समिती सभापती सुरेखा कैलास टिपले, उपसभापती योगेश फुसे, हिंगणघाट भाजपा तालुका अध्यक्ष आकाश पोहाणे, समुद्रपूर भाजपा तालुकाध्यक्ष संजय डेहणे,हिंगणघाट युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष विठूभाऊ बेनीवार, युवा मोर्चाचे कवीश्वर इंगोले, वामन चंदणखेडे,नंदोरी सरपंच संजीवनी राऊत, रोशन पांगुळ, अमोल गवळी तसेच सर्कल मधील सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच व ग्रामपंचायत मधील सर्व सदस्य गण व भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाचे यांनी भाग घेतला.सुप्रसिद्ध मानस उद्योग समूहाचे संचालक तथा शेतकरी नेते आनंदराव राऊत यांनीसुद्धा आंदोलनस्थळी भेट देऊन आपले समर्थन जाहिर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *