- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेची नविन कार्यकारिणी जाहीर

■ संपूर्ण महाराष्ट्रातून सुरु करणार 5000 एक शिक्षकी शाळा

नागपूर समाचार : विदर्भातील 1997 पासून सुरु असलेली कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था संपूर्ण विदर्भात आज 1035 एक शिक्षकी शाळांचे संचालन करीत आहे. या शाळांमध्ये ३५ हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहे. संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात आता संपूर्म महाराष्ट्रात पाच हजार एक शिक्षकी शाळा सुरू करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

ना. श्री. गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार, दि. 01 जून, 2025 रोजी कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्या कार्यकारी मंडळाची बैठक झाली. बैठकीत संस्थेच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. संस्थेच्या शिक्षक, पर्यवेक्षकांच्या माध्यमातून दुर्गम गावा-गावांत शैक्षणिक कार्याशिवाय सामाजिक व आध्यात्मिक कार्याचाही प्रगती अहवाल मांडण्यात आला. कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्या कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय सुरु असलेल्या ‘संस्कारातून शिक्षण’ या संकल्पनेतून गावातील शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. गावांचाही गावातील नागरिकांच्याच सहभागीतेतून विकास झालेला बघायला मिळत आहे.

शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी बाबत महाराष्ट्र सरकार तसेच अनेक खाजगी संस्था व शैक्षणिक संस्थांकडून संस्थेचा यथोचित गौरव पण करण्यात आलेला आहे. संस्थेच्या या देदिप्यमान कार्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागातून संस्थेच्या कार्याची दाखल घेण्यात आली आहे. विदर्भाच्या बाहेर पण कार्य सुरु करण्याची मागणी होत असल्याने, संस्थेने संपूर्ण महाराष्ट्रातून (पहिली ते चवथी पर्यंतच्या) 5000 शाळा सुरु करण्याचे प्राथमिक लक्ष्य ठेवले आहे.

संस्थेच्या विद्यमान कार्यकारी मंडळांचा कार्यकाळ संपत आल्याने, नियमानुसार नवीन कार्यकारी मंडळाची नेमणूक जाहीर करणे आवश्यक होते. संपूर्ण प्रक्रियेनंतर आपले नविन कार्यकारी मंडळ ना. श्री. नितीनजी गडकरी यांनी जाहीर केले. तसेच नवनियुक्त मंडळाचे स्वागत आणि अभिनंदन करून शुभेच्छा दिल्यात.

संस्थेची या पुढे शैक्षणिक विकासाशिवाय, स्वयंरोजगार, स्वयंकौशल्य विकास, तंत्र शिक्षण, गरिब व गरजू विध्यार्थ्यांसाठी निवासी वसतीगृह आदी कामांवर पण लक्ष्य केंद्रित करून ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रातील सशक्त विद्यापीठ म्हणून संस्थेने नावलौकिक मिळवावा असा विश्वास पण त्यांनी व्यक्त केला.

मार्गदर्शक मंडल

मा. ना. श्री. नितीनजी गडकरी, मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस, मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे, मा. श्री. हंसराजजी अहिर, मा. श्री. सुधीर मुनगंटीवार, मा. श्री. केशवराव मानकर, मा. श्री. मितेशजी भांगडिया.

नवीन कार्यकारणी

श्री. अतुल शिरोडकर अध्यक्ष, श्री. राजीव हडप उपाध्यक्ष, श्री. मुरलीधर चांदेकर उपाध्यक्ष, श्री. प्रशांत बोपर्डीकर सचिव, श्री. मिलिंद कानडे कोषाध्यक्ष.

सदस्य : मा. डॉ. उपेंद्र कोठेकर, मा. आ. श्री. बंटी भांगडिया, मा. श्री. सुधिरजी दिवे, मा. डॉ. राजीव पोद्दार, मा. श्री. संजय फांजे, मा. आ. श्री. संजय पुराम, मा. श्री. राजकुमार बडोले, मा. श्री. अशोक नेते, मा. श्री. विरेंद्र अंजनकर, मा. श्री. अविनाश घुशे, सौ. रेखाताई मावस्कर, सौ. मायाताई इवनाते, मा. श्री. अनिल जोशी, मा. श्री. भूपेंद्र शहाणे, मा. श्री. अतुल देशकर, अॅड. श्री. संदीप शास्त्री, मा. श्री. निरंजन देशकर, मा. श्री. अतुल मोहरिर आणि मा. श्री. रूपेश ढेपे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *