महाराष्ट्र समाचार : नागपूर ते मुंबई पर्यंतच्या समृद्धी मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिर्डीत करण्यात आलं.
शिर्डी ते भरवीर या ऐंशी किलोमीटर अंतराचा हा दुसरा टप्पा आहे. येत्या सहा महिन्यात मुंबईपर्यंतचा संपूर्ण समृद्धी मार्ग सुरू होईल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्री या दोघांनीही व्यक्त केला.
समृद्धी महामार्ग गडचिरोली पर्यंत नेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितलं. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं.