- Breaking News, नागपुर समाचार, विदर्भ

नागपूर समाचार : फळपिक विमा योजनेत भाग घेण्यासाठी ६ जुलै पर्यंत मुदतवाढ

नागपूर समाचार : पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना मृग बहार २०२५-२६ मध्ये सहभागी होण्यासाठी ६ जुलै २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून नागपूर विभागातील जास्तीत-जास्त संत्रा, मोसंबी आणि लिंबु उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना ही मृग बहार २०२५-२६ करिता राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात येत असून या योजनेत कर्जदार व बिगरकर्जदार शेतकऱ्यांना सहभाग घेण्याची अंतिम मुदत ३० जून २०२५ होती. या योजनेत सहभागी होण्यासाठी आधार क्रमांक पडताळणी आवश्यक असते.मात्र, २७ जून २०२५ पासून आधार क्रमांक पडताळणीमध्ये काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यास अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे योजनेत सहभागी होण्याचा कालावधी वाढविण्यात यावा असा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठविला होता. यास मंजुरी देण्यात आली असून केंद्र शासनाने २ जुलै २०२५ रोजी दिलेल्या निर्देशानुसार संत्रा, मोसंबी आणि लिंबु पिकांकरिता विशेष बाब म्हणून फळपिक विमा योजना मृग बहार २०२५-२६ मध्ये सहभागी होण्यासाठी ६ जुलै २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

केंद्र शासनाने मुदतवाढ दिल्यामुळे विभागातील जास्तीत-जास्त संत्रा, मोसंबी आणि लिंबु उत्पादक शेतकऱ्यांनी फळपिक विमा योजनेत भाग घेण्यासाठी स्वत: www.pmfby.gov.in पोर्टलवर तसेच बँक विमा कंपनीचे नियुक्त केलेले एजंट, क्रॉप इन्शुरन्स ॲप व सामुहिक सेवा केंद्र (सीएससी) यांच्या मार्फत योजनेतील सहभागाची नोंद करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *